Thursday, September 28, 2017

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अभूतपूर्व संपाची रोजनिशी


दोन लक्ष अंगणवाडी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप!

दि. १२ रोजी आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उग्र व संतप्त निदर्शने!

महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषदा व मंत्री तथा आमदारांच्या कार्यालय व निवासस्थानांवर 
मोर्चे व धरणा कार्यक्रम!

महाराष्ट्र राज्यात महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांना दरमहा रुपये ५,०००/- तर मदतनिसांना दरमहा रुपये २,५००/- असे अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची शासनाद्वारे नेमणूक केली जात असून त्यांच्या कामावर शासनाचे नियंत्रण आहे. तरी देखील शासन त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यास तयार नाही. त्यांना स्वयंसेविका व मानसेवी समजले जाते. दिवसातून पाच तास काम ठरलेले असले तरी त्यांच्याकडून जिल्हा परिषद कार्यालये अन्य कामे करवून घेतात. त्या कामाचा त्यांना मोबदला मिळत नाही. पूर्ण वेळ काम करून देखील त्यांना अंशकालीन मानसेवी स्वयंसेविका समजले जाते. वस्तुत: त्या पूर्ण वेळ काम करतात परंतु त्यांना किमान वेतन अथवा सामाजिक सुरक्षांचा लाभ दिला जात नाही. 
देशातील इतर राज्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यापेक्षा जास्त मानधन दिले जाते. उदा. तेलंगणा राज्यात १०,५००/-, दिल्लीत १०,५००/-, केरळमध्ये १०,०००/- रुपये मानधन दिले जाते. आंध्र प्रदेश, गोवा, हरियाणा, कर्नाटक, तमिलनाडु इत्यादी राज्यांमध्ये त्यांना महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त मानधन दिले जाते. पाँडेचरीत तर त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी देण्यात आलेली आहे. ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर व सातत्याने प्रचंड मोर्चे काढल्यानंतर महाराष्ट्र सरकारने, मा. सचिव, महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व नियोजन विभागाचे उच्च अधिकारी व कृती समितीच्या नेत्यांचा समावेश असलेली “मानधनवाढ समिती” दि. २०/०८/२०१६ रोजी गठीत केली. या समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता व शिक्षणाधारित मानधनवाढ देण्याची किंवा मानधनात दुपटीने वाढ करण्याची एकमताने शिफारस दि. ०९/०३/२०१७ रोजी शासनाला केली. अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना समान मानधन द्यावे व मदतनिसांना सेविकांच्या ७५ % मानधन द्यावे, अशीही महत्वपूर्ण शिफारस या मानधनवाढ समितीने केली आहे. 
महाराष्ट्र राज्यात, विशेषत: आदिवासी विभागात बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना टीएचआर दिला जातो. तो अत्यंत निकृष्ट असतो. एका सर्वेक्षणानुसार बालकांनी टीएचआर खाण्याचे प्रमाण फक्त ५ % असून, बाकीचा टीएचआर फेकून दिला जातो. टीएचआरऐवजी दुसरा योग्य पर्यायी आहार देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्षे करीत आहेत. तीन ते सहा वयोगटातील बालकांना ४.९२ रुपयांचा पूरक पोषण आहार दिला जातो. त्यातून इंधनखर्च व बचतगटांचे कमिशन वजा जाता बालकांना ४ रुपयांमध्ये दोन वेळचा आहार देण्यात येतो. २०११ मध्ये ही रक्कम ठरली व महागाई दुपटी, तिपटीने वाढली तरी तिच्यात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे बालकांचे कुपोषण वाढत आहे. ही रक्कम किमान तिपटीने वाढवून द्यावी अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे कुपोषण अंशत: कमी होण्यास मदत होईल. 
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून पासूनचे मानधन मिळालेले नाही. त्याही आधी ३ ते ४ महिने मानधन थकणे ही नेहमीचीच बाब झालेली होती. मानधनाशिवायच त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीवर जावे लागले होते. आताही  गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्या हातात पैसा नव्हता. मंत्र्यांनी मात्र वाजतगाजत गणेशोत्सव साजरा केला, ही शरमेची गोष्ट आहे. अंगणवाडी केंद्रांचे भाडे जानेवारी, २०१७ पासून मिळालेले नाही. जानेवारी, २०१७ पासून पूरक पोषण आहाराची रक्कम पाठविण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर अंगणवाडी केंद्रांकरिता लागणारी रजिस्टर्स व छापील फॉर्म्स सेविकांना पुरविण्यात आलेले नाहीत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी लागणाऱ्या निधीत दर वर्षी कपात करण्यात येत आहे, त्यामुळे योजनेचे नियमित काम करणे देखील कठीण झाले आहे. या योजनेसाठी लागणारा निधी दुपटीने तरी वाढवून देण्यात यावा अशी कृती समितीची मागणी आहे. 
मानधनवाढ समितीचा एकमताचा अहवाल शासनाला सादर केल्यानंतर दि. ३०/०३/२०१७, ०६/०६/२०१७ व २७/०७/२०१७ रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची मा. पंकजा मुंडे, मंत्री, महिला व बालविकास यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. वरील बैठकीत मा. मुख्यमंत्री, मा. वित्तमंत्री यांच्याशी कृती समितीच्या नेत्यांची सविस्तर चर्चा घडवून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा निर्णय घेण्याचे मा. पंकजा मुंडे यांनी स्पष्ट व ठोस आश्वासन दिले होते. दि. ३०/०३/२०१७ रोजी विधानभवनात झालेल्या बैठकीतील आश्वासनामुळे कृती समितीने १ एप्रिलपासून पुकारलेला बेमुदत संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्या बैठकीला ५ महिन्यांचा काळ लोटला तरी अजूनही मानधनवाढीचा निर्णय झालेला नाही.        
दि. २०/०७/२०१७ रोजी बीड येथे व २५/०७/२०१७ रोजी मुंबई येथे मोर्च्यासमोर येऊन मा. पंकजा मुंडे यांनी वरील आश्वासनांचा पुनरुच्चार केला. विधानसभेत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला असता, मा. पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न एका आठवड्यात सन्माननीय व समाधानकारक रित्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व उद्रेक आहे.    
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने ११ सप्टेंबर २०१७ पासून दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुकारलेला आहे. त्याचप्रमाणे दि. १२ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर अभूतपूर्व निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद कार्यालये, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त व विभागीय आयुक्तांची कार्यालये तसेच मंत्री व आमदारांची कार्यालये व निवासस्थाने या सर्व ठिकाणी मोर्चे काढण्यात येतील. सणासुदीच्या काळात आपल्या महिला कर्मचाऱ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ आणणाऱ्या शासन व प्रशासनाचा या सर्व मोर्च्यांमध्ये तीव्र निषेध करण्यात येईल.

अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींनो,

सर्वांना माहितच आहे की संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या कृती समितीने 11 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. हा संप मानधनवाढ व आहाराचे दर व दर्जा या बाबतीतील आपल्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाल्याशिवाय मागे घेतला जाणार नाही.

संपाच्या काळात खालील कामांवर पूर्णपणे बहिष्कार टाकायचा आहे. कोणतेही काम करायचे नाही

❎ अंगणवाडीचे नियमित कामकाज
❎ आहार शिजवणे व त्याचे वाटप
❎ बैठका व कार्यक्रम
❎ लिखाणकाम व अहवाल
❎ कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग 

संपाची शासनाला व प्रशासनाला नोटीस बजावण्यात आलेली आहे. स्थानिक पातळीवर कुणीही दबाव आणला तरी त्याला बळी पडू नका. आपल्या भूमिकेवर ठाम रहा. 

हमारी युनियन! हमारी ताकद!

13 सप्टेंबर: मुंबई - आज दुपारी 12 वाजता महिला व बालविकास विभागाच्या सचिव मा. विनिता वेद सिंघल यांच्यासोबत कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीत आयसीडीएस आयुक्तालय व महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  त्यामध्ये प्रशासनाकडे सर्व कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध असलेल्या माहितीबद्दल चर्चा करण्यात आली असता त्यांच्याकडे शिक्षणाबाबत आकडेवारी उपलब्ध नसल्याने फक्त सेवाज्येष्ठतेचा मुद्दा ग्राह्य धरण्यात यावा असे ठरले. सेवाज्येष्ठतेनुसार वर्गवारी करून त्यानुसार  अपेक्षित मानधनाबाबत चर्चा करून तक्ता तयार करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने सेवाज्येष्ठतेनुसार वर्गीकरण, त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांना देण्याचे मानधन व त्यासाठी लागणारा निधी यांचा तक्ता तयार करण्यासाठी 2 तासांचा अवधी मागितला. 
त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या बैठकीत मा. आयुक्त कमलाकर फंड उपस्थित होते. बैठकीत मानधनवाढीच्या तक्त्याप्रमाणे लागणार्‍या रकमेसहित प्रस्ताव तयार करण्यात आला. जे काम पाच महिन्यांपासून रखडले होते, ते संपाच्या दट्ट्यामुळे एका दिवसात झाले. 
15 सप्टेंबर रोजी मा. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे व मा. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून मा. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. 
आपल्या संपाचा दबाव असाच कायम राहीला तरच पुढील बैठका लवकर होतील व कॅबिनेटच्या बैठकीत मानधनवाढीच्या अजेंड्यावर चर्चा होऊन निर्णय होईल. आपण जर एकजुटीने लढलो नाही व संप नेटाने केला नाही तर शासन पुन्हा वेळकाढू धोरण अवलंबेल. म्हणूनच कृती समिती राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खालील आवाहन करीत आहे. 
✳ संप नेटाने सुरू ठेवा.
✳ अंगणवाडीचे कुलूप स्वतः उघडू नका व कुणाला चावी देऊ नका. 
✳ आहारवाटपासहित सर्व कामकाज बंदच ठेवा. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आपल्या न्याय्य मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू झालेला आहे हे सर्वांना माहितच आहे. हा संप सामोपचाराने मिटावा म्हणून एका बाजूला विविध आंदोलने व बैठका होत आहेत तर दुसर्‍या बाजूला तो मोडून काढण्यासाठी प्रशासन दबावतंत्राचा वापर करीत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना धमकावले जात आहे, त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत आणि इतर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना व आशा इत्यादी शासनाच्या मानधनी, विनामानधनी सेवेत असलेल्या अन्यायग्रस्त महिला कर्मचाऱ्यांना अंगणवाडीचा आहार वाटण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. 
कृती समिती सर्व कर्मचाऱ्यांना नम्रपणे आवाहन करीत आहे की त्यांनी शासनाच्या ह्या दुटप्पी धोरणाला अजिबात बळी पडू नये. संपकाळात अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या कोणत्याही कामाची जबाबदारी घेण्यासाठी तयार होऊ नये. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत पूर्ण सहकार्य करावे. 

योजना कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आमदार व मंत्र्यांना निवेदन

प्रति-
माननीय ..........................
मंत्री, ...............................
महाराष्ट्र राज्य                       

माननीय आमदार,
मतदार संघ .......................

विषय- महाराष्ट्रातील दोन लाख, दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या संपात शासकीय पातळीवर मध्यस्थी करून सन्मामनीय तोडगा काढण्याबाबत 

महोदय/ महोदया,

अनेक वर्षांपासून अंगणवाडी कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यासाठी लढत आहेत. देशाची भावी पिढी घडविण्यासाठी त्या तळागाळात देत असलेल्या पोषण, आरोग्य व शिक्षणासारख्या मूलभूत शासकीय सेवांचे महत्व लक्षात घेऊन त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, दरम्यानच्या काळात किमान जगण्याइतके मानधन मिळावे, त्या देत असलेल्या सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांना सर्व सोयी, सुविधा द्याव्यात व टीएचआरसारखा निकृष्ट पाकीटबंद आहार बंद करून सर्व लाभार्थ्यांना ताजा शिजवलेला पूरक पोषण आहार द्यावा व आहाराचा दर तिपटीने वाढवावा या मागण्या त्यांनी प्रामुख्याने उचललेल्या आहेत. २०१० पासून महाराष्ट्रातील प्रमुख ७ संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे गठन केले व त्याच्या वतीने अनेक लढे केले, यात प्रामुख्याने २०१० मध्ये केलेला १० दिवसांचा संप, २०१४ मध्ये केलेला १ महिन्यांचा संप यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 

गेल्या वर्ष, दोन वर्षांपासून वाढती महागाई, केंद्र शासनाने २०११ नंतर मानधन वाढवायला दिलेला नकार, २०१५पासून बजेटमध्ये होणारी कपात, राज्यांकडे जास्त जबाबदारी सोपविण्याचा धोरणात्मक निर्णय व या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनी वाढवलेले मानधन यामुळे महाराष्ट्रात मानधनवाढीचा मुद्दा खूपच संवेदनशील बनला व त्यासाठी सातत्याने अनेक आंदोलने झाली. कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे शासनाने २० जुलै २०१६ रोजी महिला व बालविकास खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली मानधनवाढ समितीचे गठन केले, ज्याच्यात कृती समितीमधील संघटनांचे ५ प्रतिनिधी घेण्यात आले. या समितीने अनेक बैठका करून एकमताने मानधनवाढीचा प्रस्ताव तयार केला ज्यात सेवाज्येष्ठता व शिक्षण हे निकष ग्राह्य धरण्यात आले होते. प्रस्तावावर आवश्यक त्या गतीने कार्यवाही होत नसल्याने निर्णय लांबत गेला. दरम्यानच्या काळात नियमितपणे मानधन व आहाराचे बिल मिळत नसल्याने असंतोष वाढत गेला. त्यामुळे कृती समितीने १ एप्रिलपासून संपाची नोटीस दिली, ३० मार्ज रोजी झालेल्या बैठकीत २ महिन्यात मानधनवाढीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे संप स्थगित करण्यात आला. ३ महिन्यांनंतरही काहीच हालचाली न झाल्यामुळे ११ जुलै रोजी पुन्हा ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची नोटीस देण्यात आली. 
त्यानंतर अनेक आंदोलने झाली. २० जुलै रोजी बीड व २५ जुलै रोजी आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात स्वत: माननीय मंत्री पंकजा मुंडे यांनी मोर्चासमोर येऊन ८ दिवसांत मानधनवाढीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, विधानसभेत माननीय आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात देखील त्यांनी हेच सांगितले. तरी देखील ११ सप्टेंबरपर्यंत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही, माननीय मंत्री पंकजा मुंडे यांनी मा. वित्तमंत्री व मा. मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक घेण्याचे जे आश्वासन दिले होते, ते पाळले नाही इतकेच नाही तर त्यांनी कृती समितीला बोलावून संप टाळण्यासाठी वाटाघाटी देखील केल्या नाहीत. त्यामुळे संप पुकारण्याशिवाय कृती समितीला दुसरा उपाय राहिला नाही व त्याप्रमाणे ११ सप्टेंबरपासून २ लाख दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशीच मुंबईला प्रचंड निदर्शने करून कर्मचाऱ्यांनी आपल्या निर्धाराची चुणूक दाखवली आहे. शिवाय संपूर्ण राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात रोज तीव्र आंदोलने होत आहेत. मंत्रालयात देखील सातत्याने बैठका होत आहेत परंतु अजूनही तोडगा न निघाल्यामुळे संप सुरूच आहे. राज्यातील ६५ लाखांहून जास्त लाभार्थी पोषण आहारापासून व पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. मानधनवाढ व आहाराच्या दरात वाढ हे प्रश्न लवकर न सुटल्यास ही परिस्थिती अजूनच बिघडण्याची शक्यता आहे. तरी आपण स्वत: यात जातीने लक्ष घालावे व आपल्या मध्यस्थीने हा संप सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. सोबत आधीच्या सर्व नोटिसा व मागणीपत्रक जोडल्या आहेत.  

धन्यवाद.


नागपूर येथे रामगिरीवर अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांना लाठीमार करून अटक

१५ सप्टेंबर- नागपूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी रामगिरीवर गेलेल्या व शांतपणे वाट पाहणार्‍या  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व जिल्हा कृती समितीमधील सीटू, आयटक व एचएमएसचे स्थानिक नेते कार्यकर्ते  यांना पोलीसांनी लाठीमार करून अटक केली आहे. सुमारे 250 अंगणवाडी कर्मचारी व युनियनच्या  कार्यकर्त्यांना पोलीस हेडक्वार्टर येथे आणण्यात आले आहे अशी माहिती सीटूचे नेते मधुकर भरणे यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या दडपशाहीचा तीव्र निषेध करीत आहे.

18/09/2007 

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची माननीय महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत आज 18 सप्टेंबर रोजी बैठक झाली.  परंतु तोडगा न निघाल्यामुळे संप सुरू राहणार  

उद्या पुन्हा मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे व त्यात सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उद्या होणाऱ्या चर्चेनंतर मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहे.
संप मागे घेण्याचा शासन व प्रशासनाने आग्रह धरला परंतु मानधनवाढीबाबत ठोस निर्णय होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असे कृती समितीने स्पष्ट केले आहे. संपाबाबत लवकरच तोडगा काढण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा कृती समितीने व्यक्त केली आहे. तोपर्यंत सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलने अजून तीव्र करावीत असे आवाहन कृती समितीने केले आहे. 


19/09/2017 

19 सप्टेंबर: मुंबई: काल मा महिला व बालविकास मंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे आज दुपारी 12 वाजता मा सचिवांनी कृती समितीसोबत बैठक आयोजित केली होती. त्यासाठी कृती समितीमधील सर्व सात संघटनांचे प्रतिनिधी मंत्रालयासमोरील नवीन प्रशासकीय भवनात गेले असता सचिवांनी उभ्या उभ्या सांगितले की संप मागे घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत आणि जास्तीत जास्त आधी दिली होती तितकीच म्हणजे  950, 550 व 500 रुपयांची वाढ देण्यात येईल. 
चर्चा फिस्कटल्यामुळे संप निर्धाराने सुरू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. जोपर्यंत समाधानकारक व सन्माननीय मानधनवाढ मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे. 

20/09/2017

शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला संपूर्ण पाठिंबा जाहीर

27 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील जाहीर सभेला स्वत: उद्धवजी ठाकरे संबोधित करणार


20 सप्टेंबर : मुंबई - काल महिला व बालविकास खात्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत ताठर भूमिका घेऊन मानधनवाढीच्या मागणीबाबत घूमजाव केले व त्यांच्याच अध्यक्षतेखाली वर्षभर झालेल्या चर्चेवर पाणी फेरले. आपल्याच खात्याची महत्वपूर्ण योजना चालवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत शासन व प्रशासन किती असंवेदनशील असू शकते याचा प्रत्यय काल आला. 
त्यानंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.

✳ मानधनवाढीबाबत समाधानकारक व सन्माननीय तोडगा निघेपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.

✳ सर्व जिल्ह्यांमध्ये उग्र आंदोलने करण्यात येतील.

✳ सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटी देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची परिस्थिती, शासनाचा ही योजना राबविण्याबाबतचा दृष्टीकोन व गांभीर्याचा अभाव तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या याबाबत माहिती देऊन त्यांचा पाठिंबा मिळवला जाईल.

✳ मुंबईत पुढच्या आठवड्यात 27 सप्टेंबरला प्रचंड शक्तिप्रदर्शन केले जाईल.

कालच्या निर्णयानुसार सर्वप्रथम शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता सेना भवन येथे अंगणवाडी कृती समितीचे प्रतिनिधी एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख व आरमायटी इराणी तसेच मुंबईच्या काही अंगणवाडी सेविका यांनी भेट घेतली व सविस्तर चर्चा केली.

✅ उद्धवजी ठाकरे यांनी अंगणवाडी कर्मचारी आपल्या रास्त मागण्यांसाठी करत असलेल्या संपाला व त्या रस्त्यावर उतरून करत असलेल्या लढ्याला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

✅ महिला व बालविकास विभागाच्या  सचिवांनी वाटाघाटी करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाशी केलेल्या उद्दाम वर्तनाचा त्यांनी धिक्कार केला.

✅ शासन जर संप चिरडण्यासाठी बळाचा वापर करणार असेल तर शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व तमाम शिवसैनिक अंगणवाडी भगिनींच्या पाठिशी उभे राहतील असे सांगून त्यांनी सर्वांना आश्वस्त केले.

 ✅ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मानधनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. 

✅ 27 सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर स्वतः कृती समितीच्या मंचावर उपस्थित राहून पाठिंबा देणार अशी त्यांनी जाहीर घोषणा केली. 

संप नेटाने सुरू ठेवण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे. सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लढ्यात उतरण्याचे आवाहन कृती समिती करत आहे. 

27 सप्टेंबर, चलो आझाद मैदान


२१ सप्टेंबर २०१७



आशा कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी अंगणवाडीचे काम करायला दिला नकार

महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदांना आशांच्या संघटनांची निवेदने सादर

कामाची जबरदस्ती केल्यास त्या देखील अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी
 उतरणार रस्त्यावर

आशा कर्मचाऱ्यांच्या राज्यातील सर्व संघटनांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील आशांच्या संघटनांनी आज विविध जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदांना निवेदने देऊन शासनाच्या फूटपाड्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. कोल्हापूर येथे नेत्रदीपा पाटील, सांगलीत शंकर पुजारी, साताऱ्यात आनंदी अवघडे, नांदेड येथे विजय गाभणे, जालना येथे गोविंद अर्दाड व नाशिक येथे कल्पना शिंदे, राजू देसले, लातूर, उस्मानाबाद येथे दत्ता देशमुख, ठाणे येथे बृजपाल सिंग, नंदूरबार येथे शरद पाटील आदी आशांच्या नेत्यांनी पत्रक काढून तसेच निवेदने देऊन शासनाच्या महिला व बालविकास खात्याच्या आदेशाचा धिक्कार केला. अंगणवाडी व आशा भगिनी उद्या ठिकठिकाणी या आदेशाची होळी करणार आहेत.


अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आपल्या न्याय्य मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून सुरू झालेला संप मोडून काढण्यासाठी शासन व प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या संपूर्ण महाराष्ट्रात गावोगाव अंगणवाड्या ताब्यात घेण्यासाठी सुपरवायझर, सरपंच, पोलीस येतील व चाव्या मागतील. आपण दिल्या नाहीत तर पंचनामा करून कुलपे तोडतील व अंगणवाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी आपण खालील गोष्टी करायच्या आहेत-

1. सेविका, मदतनिसांनी आपल्या गावातील लोक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, लाभार्थी पालक, महिला या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या मागण्या, संप व लढे यांची माहिती द्यावी व त्यांचा पाठिंबा मिळवावा. 

2. अंगणवाडी उघडायला कुणीही आले तरी चावी देऊ नये. 

3. कुलूप तोडायचा प्रयत्न केल्यास समजावून सांगावे. न ऐकल्यास आपल्या बाजूच्या गावकऱ्यांना सोबत घेऊन विरोध करावा. 

4. आशा कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगावे. त्यांच्या संघटनांनी संपाला पाठिंबा देत काम करायला नकार दिल्याची माहिती द्यावी व त्यांचा पाठिंबा मिळवावा.

5. अंगणवाडी कर्मचारी व आशा सर्वांनी मिळून आपल्या विरोधातील आदेशाची जाहीर होळी करावी. 

6. संपकाळात ग्रामपंचायत, वस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद अशा ठिकाणांपैकी रोज कुठे ना कुठे आंदोलन करण्यात यावे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो!

 लढेंगे!  जितेंगे!

 ✳ 27 सप्टेंबर चलो मुंबई ✳


अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे शासनाच्या दडपशाही विरुद्ध प्रचंड शक्तिप्रदर्शन

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईच्या सभेत देणार जाहीर पाठिंबा 

आपापल्या गावातील लोकप्रतिनिधींना आपल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील जाहीर सभेत निमंत्रित करा. 

सभा यशस्वी करण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित रहा!

२१ सप्टेंबर २०१७

प्रति
संपादक/ वृत्त संपादक,
दैनिक/ वृत्तवाहिनी ...............................

महाराष्ट्रातील २ लाखाहून जास्त अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्षे आपल्या मानधनवाढ, नियमित मानधन तसेच चांगल्या दर्जाच्या, ताज्या शिजविलेल्या पूरक पोषक आहाराचा पुरवठा या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने लढत आहेत. गेल्या वर्षभरात तेलंगणा, केरळ, दिल्ली या राज्यांमध्ये मानधन १० हजारांवर तर कर्नाटक, हरियाणा, आंध्र प्रदेश, तमिलनाडु अशा अनेक राज्यांमध्ये ८ हजारांवर गेले आहे. महाराष्ट्रात मात्र अजूनही सेविकांना ५००० तर मदतनिसांना २५०० इतक्या तुटपुंज्या मानधनावर राबवून घेतले जात आहे. सर्व प्रयत्न करून झाल्यावर शेवटी या २ लाख अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेळकाढू धोरणामुळेच ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्यास भाग पाडले गेले असून हा संप शासनाच्या हटवादी भूमिकेमुळे अजूनही सुरू आहे. संपामुळे सुमारे ७३ लाख लाभार्थी पोषण आहार, आरोग्य व शिक्षणापासून वंचित आहेत, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर आहे. संप सुरू होण्याअगोदर तो टाळण्यासाठी शासनाने काहीच पुढाकार घेतला नाही आणि आता तर संपावर उतरलेल्या गरजू महिला कर्मचाऱ्यांवर दडपशाही सुरू झाली आहे. शासन मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी संप मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थिती सर्व पक्षीय पाठिंबा मिळवण्यासाठी कृती समितीच्या नेत्यांनी विविध पक्षप्रमुखांची भेट घेऊन पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला व सर्वप्रथम शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेण्यात आली. त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना व संपाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. आता २७ तारखेला मुंबईत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रचंड शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या जाहीर सभेला माननीय उद्धवजी ठाकरे स्वत: संबेधित करणार आहेत. तसेच अन्य काही पक्षप्रमुखांशी बोलणी होत आहेत. त्यामधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव माजी आमदार नरसय्या आडम यांनी सभेत उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. या सभेची माहिती आपल्या माध्यमांमधून जनतेपर्यंत तसेच शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेला आपण आपले प्रतिनिधी पाठवून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. 

पत्रकार परिषद- शुक्रवार दि. २२ सप्टेंबर, दुपारी ३, स्थळ- मुंबई मराठी पत्रकार संघ, महापालिका मार्ग, मुंबई. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

To-
The Editor/ News Editor,
News Paper/ News Channel…………………………

More than 2 lack Anganwadi workers are demanding raise in their honorarium, regular payments and supply of freshly cooked good quality supplementary nutritional food and struggling to achieve them for last many years. States like Telangana, Kerala and Delhi have raised the honorarium beyond Rs 10,000 and many other states like Andhra Pradesh, Karnataka, Tamil Nadu and Haryana up to or more than Rs 8000. Maharashtra is making the workers sloth for a meagre amount of Rs. 5000 and helpers for 2500. The Anganwadi Workers have gone on Indefinite Strike from 11th September as a last resort and still continuing it. 73 lack malnourished children and women beneficiaries are deprived of supplementary nutrition, pre-primary education and health services due to adamant attitude of the government. Instead of discussing and meeting their just demands, it is resorting to pressure tactics. The sole responsibility of the suffering of beneficiaries lies upon the government. After government denied having talks with us, we decided to meet various Party heads to convey our plight. We met Shiv Sena head Shri Uddhavji Thakare and discussed with him. He has given full support to the demands and strike of the Anganwadi workers and has agreed to address the mammoth rally on 27 the September in Mumbai. CPIM State Secretary Narasayya Adam Master has also given his support. We have organized a press conferences to give the Media the information about the rally. Please send your representatives to the press conferences whose details are given below. 

Press Conference- Friday, 22nd September at 3 pm. Venue: Mumbai Marathi Patrakar Sangh, Mahapalika Marg, Mumbai 1 

शासनाने देऊ केलेली तुटपुंजी मानधनवाढ कृती समितीने नाकारली
संप सुरूच ठेवण्याचा निर्धार

आज शासनाने कृती समितीचा भाग नसलेल्या एका फुटीर संघटनेला हाताशी धरून सेविकांना 1500, मिनी अंगणवाडी सेविकांना 1250 व मदतनिसांना 1000 रुपयांची मानधनवाढ देण्याची तडजोड जाहीर केली आहे. ही मानधनवाढ अत्यंत तुटपुंजी असून कृती समितीने ती पूर्णपणे फेटाळली आहे. शासनाने कृती समितीला वाटाघाटीसाठी बोलावून सन्माननीय तोडगा काढावा व मानधनवाढ समितीने तयार केलेल्या सेवा ज्येष्ठतेवर आधारित प्रस्तावानुसार वाढ द्यावी ही कृती समितीची भूमिका आहे. कृती समितीने शासनाच्या फूटपाड्या, कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला आहे. कृती समितीने संप निर्धाराने सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

*27 सप्टेंबरच्या मुंबई येथे आयोजित सभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण ताकद उतरवावी असे आवाहन कृती समितीने केले आहे.* 



कृती समितीने सरकारचा तुटपुंज्या मानधनवाढीचा प्रस्ताव फेटाळला

✳ संप सुरूच राहणार✳ 

✳ अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकजूट अभंग✳

शासनाने एका छोट्याश्या फुटीर गटाला हाताशी धरून संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने हाणून पाडला आहे. 
शासन विविध प्रकारची परिपत्रके काढून तसेच सेविका मदतनिसांवर दडपण आणून संप मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. संपावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी सात संघटनांच्या कृती समितीने खालील भूमिका घेतली आहे. 

✅ महिला व बालविकास खात्याने कृती समितीसोबत ताबडतोब चर्चा करावी.

✅ आधी आश्वासन दिल्याप्रमाणे ताबडतोब  मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात यावी. 

✅ शासनाने गठित केलेल्या मानधनवाढ समितीच्या एकमताच्या शिफारशीनुसार सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना 10000 मध्य धरून सेवाज्येष्ठतेवर आधारित मानधनवाढ द्यावी. मदतनिसांना सेविकांच्या 75 % मानधन देण्यात यावे. 

✅ आहाराच्या दरात तिपटीने वाढ करावी व सर्व लाभार्थ्यांना गरम ताजा स्थानिक पातळीवर शिजवलेला आहार द्यावा.

✳ सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कृती समितीचे आवाहन आहे की त्यांनी ठामपणे संप सुरू ठेवावा.

✳ प्रशासनाच्या दडपणाला बळी पडू नये. कुणालाही चाव्या देऊ नयेत. स्थानिक प्रशासनाने  बैठकांना बोलावल्यास जाऊ नये. अंगणवाड्या उघडू नयेत. आहार वाटप करू नये व दुसऱ्या कुणालाही करू देऊ नये.

✳ फुटीर संघटनेला व फोडा, झोडा, राज्य करा अशी भूमिका घेणाऱ्या सरकारला आपली एकजूट अभंग आहे हे दाखवून द्या.

✳ शासनाच्या कामगार विरोधी आदेशांची होळी करा

✳ 27 सप्टेंबरला प्रचंड संख्येनी मुंबईतील सभेत उपस्थित राहून आपला निर्धार व्यक्त करा. 


23 सप्टेंबर 2017

संदर्भ क्रमांक- एबावि- 2017/प्र.क्र. 261/ का06

प्रति-
माननीय महिला व बालविकास मंत्री,    
महाराष्ट्र राज्य
    
माननीय सचिव,
महिला व बालविकास विभाग

विषय- आपण 22 सप्टेंबर रोजी दिलेल्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीच्या घोषणेबाबत कृती समितीची भूमिका

महोदया,

आपल्या विभागाच्या वतीने काल अंगणवाडी सेविकांना रुपये 1500, मिनी अंगणवाडी सेविकांना रुपये 1250 व मदतनिसांना रुपये 1000 मानधनवाढ 1 ऑक्टोबर 2017 पासून लागू करण्यात येईल असे कळवले आहे. त्याबाबत कृती समितीचे म्हणणे खालीलप्रमाणे-

1. ही मानधनवाढ शासनाने गठित केलेल्या मानधनवाढ समितीच्या शिफारशीपेक्षा खूपच कमी असून वाढत्या महागाईत ती सर्वार्थाने अपुरी आहे. 

2. आधी मान्य केलेली अनेक तत्वे त्यात पाळली गेलेली नाहीत. ती तत्वे म्हणजे 1- सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे वर्गवारी करून प्रत्येक टप्प्यात वाढत जाणारे मानधन द्यावे. 2- सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना समान मानधन द्यावे आणि 3- मदतनिसांना सेविकांच्या 75 टक्के मानधन द्यावे. 

3. आपण मानधनवाढ 1 एप्रिल 2017पासून लागू करण्याचे मान्य केले होते. परंतु दिनांक 22च्या पत्रानुसार ती 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.     

4. वरील काही गोष्टींच्या तपशिलांमध्ये चर्चा करून काही मार्ग काढण्यासाठीच आपण आम्हाला 19 सप्टेंबर रोजी नवीन प्रशासकीय भवनाच्या कार्यालयात निमंत्रित केले होते. परंतु आपल्या चर्चा न करण्याच्या भूमिकेमुळे आम्हाला काही तोडगा न काढताच परत जावे लागले. कालचा तोडगा घोषित करण्याआधी महाराष्ट्रातील 7 संघटनांच्या कृती समितीशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु आमच्याशी चर्चा न करताच आपण एकतर्फी घोषणा केली. 

5. राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कृती समितीने दोन महिन्यांपूर्वी नोटीस देऊन संप केलेला असताना कृती समितीशी चर्चा न करता एकतर्फी घोषणा करणे व संप मागे घेतला जाईल अशी अपेक्षा करणे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही.

वरील सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही मागणी करतो की शासनाने तातडीने कृती समितीशी चर्चा करावी व मानधनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढावा. 
सामोपचाराने संप मिटविण्यासाठी वाटाघाटी करण्याऐवजी दडपशाही करून संप चिरडण्याचा जो मार्ग शासन अवलंबित आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. दडपशाहीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करून वातावरण कलुषित करू नये, त्यामुळे तडजोडीच्या मार्गात बाधा येईल असा आम्ही आपल्याला इशारा देतो.   

वाटाघाटीच्या माध्यमातून सामोपचाराने व सन्माननीय तोडगा काढून संप मिटेपर्यंत हा महाराष्ट्रव्यापी संप अंगणवाडी कर्मचारी चालू ठेवतील याची कृपया नोंद घ्यावी.

शासनाच्या संप चिरडून काढण्याच्या धोरणाविरुद्ध दिनांक 27 सप्टेंबर रोजी आम्ही कृती समितीच्या वतीने आझाद मैदान येथे प्रचंड सभेचे आयोजन केल आहे. त्याआधी आपण आमच्याशी चर्चा करावी व प्रश्न सामोपचाराने सोडवावा.

धन्यवाद.


प्रकल्प अधिकार्‍यांचा बोगस  कारभार उघड

अंगणवाडी मधून बोगस आहार वाटप दाखवून भ्रष्टाचार
प्रशासनाचे दावे ठरले फोल

अनेक ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अनधिकृत व्यक्तींकडून होत असलेल्या 
आहार वाटपाला केला तीव्र विरोध 

25 सप्टेंबर : राज्यभरात संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अनधिकृत व्यक्तींकडून होणारे आहार वाटप थांबवले. ठाणे व मुंबईत आहार शिजवून देणार्‍या बचतगटांना व ठेकेदारांना प्रकल्प अधिकार्‍यांकडून  आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी नावासाठी थोडा आहार तयार करून नेहमीच्या डब्यात भरून एखाद्या अंगणवाडीत न्यावा व एक दोन बालकांना तो वाटत असतानाचे फोटो काढून पोस्ट करावेत म्हणजे त्यांना अंगणवाडी मधून आहार वाटला जात असल्याचे सिद्ध करता येईल व त्या बदल्यात ठेकेदारांना नेहमी इतक्याच आहाराचा मोबदला दिला जाईल. 
हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा दावा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. असा खोटा कारभार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. महिला व बालविकास विभागाला कुपोषण खरोखरच कमी करायचे असेल तर त्यांनी कृती समितीशी बोलणी करून तोडगा काढावा व संप सामोपचाराने मिटवून आहार वाटप खऱ्या अर्थाने सुरू करावे. अशा प्रकारे लाभार्थ्यांना फसवून, शासनाची दिशाभूल करून भ्रम निर्माण करू नये.
अशी फसवणूक करणाऱ्यांना लाभार्थी बालकांचे पालक पकडून पोलिसांच्या ताब्यात देतील असा इशाराही कृती समितीने दिला आहे.

26/09 12:15 am] Shubha Shamim: *महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती*

अंगणवाडी कर्मचारी संघटना, जनशक्ती, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई, ४०००१३ ०२२२४९५१५७६/
९४२२०१०९७०

आयटक, भुपेश गुप्ता भवन, ८५, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई, ४०००२५ ०२२२२४३७४९३०

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, निळकंठ अपार्टमेंट, डॉ भडकमकर हॉस्पिटलसमोर, महागिरी, ठाणे ०२२२५३४६२०५

अंगणवाडी कर्मचारी सभा, हाऊस नं २०, पंडूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – ४१६ ८१२ ९४२२३७९७५३

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ, मु. पो. बोरगाव, ता. जि.लातूर ९८२२०८१४८७

महाराष्ट्र राज्य पु. प्रा. सेविका आणि मदतनीस महासंघ, ४२६/२, ई वॉर्ड, शाहुपुरी, कोल्हापूर.  ८५५२८५४८४९

कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन, गाळा ५४,५५, पंचवटी टॉकिज, इचलकरंजी, जि. कोल्हापूर, ९८२२२६९१६३ 

२५ सप्टेंबर २०१७

प्रति

संपादक/ वृत्त संपादक,

दैनिक/ वृत्तवाहिनी .......................

महाराष्ट्रातील २ लाखाहून जास्त अंगणवाडी कर्मचार्‍यांनी गेले १५ दिवस आपल्या मानधनवाढ, नियमित मानधन तसेच चांगल्या दर्जाच्या, ताज्या शिजविलेल्या पूरक पोषक आहाराचा पुरवठा या प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारला आहे. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्यास भाग पाडले गेले असून हा संप शासनाच्या हटवादी भूमिकेमुळे अजूनही सुरू आहे. संपामुळे सुमारे ७३ लाख लाभार्थी पोषण आहार, आरोग्य व शिक्षणापासून वंचित आहेत, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर आहे. संप सुरू होण्याअगोदर तो टाळण्यासाठी शासनाने काहीच पुढाकार घेतला नाही आणि आता तर संपावर उतरलेल्या गरजू महिला कर्मचाऱ्यांवर दडपशाही सुरू झाली आहे. शासन मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी संप मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत कृती समितीने सेेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना व संपाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. २७ तारखेला मुंबईत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रचंड शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या जाहीर सभेला माननीय उद्धवजी ठाकरे स्वत: संबेधित करणार आहेत. या जाहीर सभेला आपण आपले प्रतिनिधी पाठवून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. 
---------------------------------------------

To-

The Editor/ News Editor,

News Paper/ News Channel……………………………. 

More than 2 lack Anganwadi workers are on Indefinite strike for their demands of raise in their honorarium, regular payments and supply of freshly cooked good quality supplementary nutritional food from 11th September as a last resort and still continuing it. 73 lack malnourished children and women beneficiaries are deprived of supplementary nutrition, pre-primary education and health services due to adamant attitude of the government. Instead of discussing and meeting their just demands, it is resorting to pressure tactics. The sole responsibility of the suffering of beneficiaries lies upon the government. After government denied having talks with us we met Shiv Sena head Shri Uddhavji Thakare and discussed with him. He gave full support to the demands and strike of the Anganwadi workers and has agreed to address the mammoth rally on 27 the September at Azad Maidan, Mumbai. Please send your representatives to cover the rally.


26 सप्टेंबर मुंबई- आज दुपारी  12 वाजता महिला व बालविकास मंत्री माननीय पंकजा मुंडे यांनी कृती समितीसोबत चर्चा केली. प्रशासनाच्या वतीने सचिव विनिता वेद सिंगल, आयुक्त कमलाकर फंड, उपसचिव व उपायुक्त उपस्थित होते. कृती समितीच्या वतीने एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, कमल परुळेकर, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील व अन्य नेते उपस्थित होते. 
शासनाने दिलेली मानधनवाढ कृती समितीला मंजूर नसून शासनाने नवीन प्रस्ताव तयार केला आहे काय असे विचारले असता त्यांनी असा कोणताही प्रस्ताव नाही असे सांगितले. कृती समितीने सेवाज्येष्ठतेचा मुद्दा कायम ठेऊन त्यांनी मान्य केलेल्या मानधनवाढीपेक्षा  जास्त वाढ करण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर वित्तमंत्री व मुख्यमंत्र्यांशी चर्चा  करून निर्णय घेण्याचे व पुन्हा एकदा बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले. 
आजच्या बैठकीमुळे वातावरण थोडेफार निवळले असले तरी ठोस तोडगा निघालेला नाही त्यामुळे संप सुरू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.  
उद्या कृती समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार कृती समितीने केला असून त्यात शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची उपस्थिती खूपच महत्वाची ठरणार आहे. 
मानधनवाढीबाबत समाधानकारक तोडगा निघेपर्यंत संप सुरू राहणार असून उद्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कृती समितीने केले आहे.

28/09/2017

सेविका, मदतनीस भगिनींनो, 

संप चालूच आहे. नोटीसा दिल्या तरी घाबरायचे नाही. नोटिसांना आव्हान देऊया. त्यांची होळी करूया. कालचे आझाद मैदानावरील आंदोलन अभूतपूर्व झाले. सरकार एकट्या भाजपाचे नाही. शिवसेनाही सत्तेत आहे. मा.उध्दव ठाकरे सत्तेचा रिमोट कंट्रोल आहेत. ते आपल्या पाठीशी आहेत. विजय आपलाच आहे.थोडी कळ सोसली पाहीजे. संप जोमाने चालूच ठेवायचा आहे. अंगणवाड्या उघडू नका. ऑफिसचे फोन घेऊ नका. सेवाज्येष्ठतेनुसार आणखी मानधनवाढ मिळाल्याशिवाय संप मागे घ्यायचाच नाही. लढेंगे और जीतेंगे! हमारी युनियन हमारी ताकद! 

✳ 2 ऑक्टोबरला राज्यातील प्रत्येक ग्रामसभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना व संपाला पाठिंबा देणारा ठराव मंजूर करून घ्या. लाभार्थी, बचत गट व जनतेचा पाठिंबा मिळवा.

✳ 5 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात जेलभरो  आंदोलन करायचे आहे. एकीचा विजय नक्की होतो. एकी टिकवा. नवी जुनी आपल्याकडे काही फरक नसतो. जुन्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला परमनंट केले असे कधीच सरकारने कळवलेले नाही. संप फोडण्यासाठी ऑफीस नव्या सेविका, मदतनिसांना घाबरवत  आहे. त्याना समजावा. 
हमारी युनियन हमारी ताकद!

Thursday, May 18, 2017

राजकीय अर्थव्यवस्था, जागतिकीकरण आणि कामगार वर्गाची भूमिका

भांडवलशाहीतील वर्गीय शोषण-

सिटूच्या घटनेत सिटूचे उद्दीष्ट स्पष्टपणे विषद केले आहे, सिटूची अशी मान्यता आहे की फक्त उत्पादन, वितरण आणि विनिमयाच्या सर्व साधनांचे सामाजीकरण करून आणि समाजवादी राज्याची स्थापना करूनच कामगार वर्गाच्या शोषणाचा अंत केला जाऊ शकतो. सिटू समाजवादाच्या आदर्शांवर दृढ राहून समाजाला सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त करण्यासाठी प्रतिबद्ध आहे........ वर्ग संघर्षाशिवाय कोणतेही सामाजिक परिवर्तन होऊ शकत नाही आणि कामगार वर्गाला वर्ग समन्वयाच्या मार्गावर घेऊन जाण्याच्या सर्व प्रयत्नांचा कायम विरोध व प्रतिरोध केला पाहिजे या आपल्या दृष्टिकोणावर सिटू खंबीरपणे कायम आहे.....
आपण भांडवलशाही व्यवस्था बदलू इच्छितो कारण ही व्यवस्था अन्यायावर आधारित आहे, शोषणकारी आहे आणि म्हणूनच ती दमनकारी देखील आहे. भांडवलशाही व्यवस्थेत श्रमाद्वारे निर्माण केलेली संपत्ती व मूल्य यांची लूट करूनच भांडवलशाही व्यवस्था जिवंत राहू शकते. भांडवलशाहीने कितीही दावे केले तरी वास्तव हेच आहे की त्यांनी मिळवलेला नफा हा प्रत्यक्षात कामगारांनी निर्माण केलेले मूल्यच असते, ज्याची भांडवलदार लूट करतात. कामगार ज्या मूल्याची निर्मिती करतो, ते त्याच्या जीवन निर्वाहावर होणारा खर्च किंवा त्याला दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा नेहमीच अधिक असते. कामगारांना जगण्यापुरते वेतन देऊन, भांडवलदार त्याने निर्माण केलेले सर्वच्या सर्व मूल्य हडप करतो.

उत्पादनाची भांडवली प्रणाली- भांडवलशाही वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची एक प्रणाली आहे. ही प्रणाली उत्पादनाच्या साधनांवरील खाजगी मालकी आणि वेतनावर काम करणाऱ्या कामगारांच्या शोषणावर आधारलेली आहे. भांडवलशाहीने उत्पादनाच्या सरंजामी प्रणालीला हटवून तिची जागा घेतली आहे. भांडवलाच्या आदिम संचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकरी व छोट्या कारागिरांपासून त्यांची उत्पादनाची साधने हिरावून घेऊन त्यांना वेतनभोगी कामगार बनवले गेले. उत्पादनाच्या साधनांचे भांडवलात रूपांतर केले गेले. कामगारांनी निर्माण केलेल्या अतिरिक्त मूल्याच्या, भांडवलाच्या मालकांनी म्हणजेच भांडवलदारांनी केलेल्या लुटीच्या माध्यमातून  उत्पादनाची भांडवली प्रक्रिया चालत असते.
.
मालाचे किंवा वस्तूंचे उत्पादन- भांडवली व्यवस्थेत उत्पादन बाजारासाठी केले जाते, म्हणजेच वस्तूंचे उत्पादन सार्वभौम बनले असून सर्व ठिकाणी याचाच बोलबाला आहे. मनुष्यांच्या द्वारा उत्पादित सर्व वस्तूच फक्त नाही तर मानवी श्रम देखील एक वस्तूच बनली आहे. भांडवलदारी व्यवस्थेच्या अगोदर वस्तूंचे उत्पादन कामगार फक्त आपल्या गरजा भागविण्यासाठी करीत असत परंतु भांडवलदारी व्यवस्थेत त्यांचे उत्पादन जरी वेतनभोगी कामगार करत असले तरी उत्पादनाच्या साधनांची मालकी भांडवलदारांकडे असल्यामुळे त्या उत्पादित वस्तूंची मालकी देखील आपोआपच त्यांच्याचकडे जाते. भांडवलदार त्यांचे उत्पादन समाजाच्या गरजा भागवण्यासाठी नाही तर नफा कमविण्यासाठी करतात, हा नफा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कामगारांच्या श्रमातून निर्माण झालेले अतिरिक्त मूल्यच असते.  

मूल्याचा श्रम सिद्धांत- मूल्याच्या श्रम सिद्धांताच्या माध्यमातून कार्ल मार्क्सने भांडवली शोषणाचे खरे स्वरूप उलगडून दाखवले. मार्क्सने मूल्याच्या नियमांचे निर्धारण या प्रकारे केले, कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किती वेळ लागला आणि त्याची सामाजिक आवश्यकता किती आहे यावरून त्याचे मूल्य ठरते किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे उत्पादनासाठी लागलेली श्रम वेळ हीच सामाजिक आवश्यकता असते. म्हणूनच वस्तूचे मूल्य त्याच्या उत्पादनासाठी लागलेल्या श्रम वेळेइतके असते. भांडवलशाहीच्या अंतर्गत उत्पादित वस्तूंचे उत्पादन श्रमशक्तीशिवाय होऊ शकत नाही.
श्रमशक्ती फक्त जिवंत स्त्री- पुरुषांमध्येच असू शकते. जिवंत राहण्यासाठी त्यांना अन्न, वस्त्र, ईंधन, निवारा या सारख्या जगण्याच्या साधनांची आवश्यकता असते. कामगारांना त्यांचा वंश देखील पुढे न्यायचा असतो. त्यांना मुले, बाळे देखील असतात म्हणूनच त्यांना फक्त त्यांच्या स्वत:च्याच नाही तर आपल्या मुलाबाळांच्या देखील निर्वाहासाठी पुरेशी साधने मिळणे आवश्यक आहे.

जेव्हा मनुष्य काम करतो तेव्हा तो एकाच वेळी दोन गोष्टी करत असतो. पहिली गोष्ट म्हणजे तो एखाद्या विशिष्ठ काम धंदा किंवा व्यापारात स्वत:ला गुंतवतो (उदाहरणार्थ खुर्च्या, टेबल बनविण्यासाठी सुतारकाम, कापड तयार करण्यासाठी विणकाम इत्यादी) दुसरी गोष्ट म्हणजे त्या सर्व काम करणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक श्रमशक्ती बनतात आणि त्यांच्या सामूहिक श्रमातून फक्त त्यांच्या समूहासाठी गरजेच्या वस्तूंचीच निर्मिती करीत नाहीत तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधांची पूर्तता करतात. सुतार किंवा विणकर म्हणून ते जरी एक विशिष्ठ प्रकारचे काम करत असले आणि ते त्यांचे ठोस श्रम असले तरी समाजाच्या समग्र श्रमशक्तीचा भाग म्हणून त्यांची गणना केवळ त्यांच्या विशिष्ठ कामामध्ये न होता ते काम समाजाच्या अमूर्त श्रमाचा एक भाग बनते. भांडवलशाही समाजात श्रमशक्तीचा एक मोठा भाग असंघटित श्रमशक्तीवर आधारित असतो आणि हे श्रमिक उत्पादन प्रक्रियेत नियमितपणे रोजमर्राची विविध कामे करीत असतात. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात जिथे जिथे गरज पडेल तिथे ते आपली श्रमशक्ती विकत असतात. 
  
भांडवलशाही उत्पादन आणि नफा- भांडवलदार थोड्याशा पैशांमधून (एम) आपले काम सुरु करतो. तो त्या पैशाचे रूपांतर यंत्रसामुग्री, कच्चा माल व श्रमशक्तीत करून त्यांना कामाला लावतो. यातून तो ज्या वस्तूंचे उत्पादन करतो, त्यांना जास्त पैसे मिळवण्यासाठी बाजारात विकतो. अशा तऱ्हेने मिळवलेल्या जास्तीच्या पैशातून (एम१) तो आपल्या कामात वाढ करत जातो. उत्पादित वस्तूंची बाजारात विक्री करून तो जो जास्तीचा पैसा मिळवतो, तो त्याचा नफा असतो. भांडवलदाराच्या अधिक आणि अधिक नफा कमविण्याच्या लालसेला कधीही अंत नसतो. ती वाढतच जाते. आता प्रश्न हा येतो की हा भांडवलदार एम चे रूपांतर एम१ मध्ये कसा काय करत जातो? त्याने सुरवातीला लावलेल्या पैशात वाढ कशी होते?  त्याचे अतिरिक्त धन किंवा नफा कुठून येतो? हा नफा त्या मूल्यातून येतो जे कामगार कच्च्या मालावर प्रक्रिया करून, त्यामधून तयार माल बनवून निर्माण करतो.

वेतन- भांडवलदार आपल्या नफ्याचा एक छोटा हिस्सा वेतनाच्या रूपात श्रमशक्तीच्या मालकांना म्हणजेच कामगारांना देत असतात. कामगारांची श्रमशक्ती मिळवण्याच्या बदल्यात त्यांना देण्यासाठी भांडवलदारांनी निर्धारित केलेले मूल्य म्हणजेच वेतन होय. अशा प्रकारे कामगार, जे उत्पादनाच्या साधनांचे मालक नसतात, त्यांच्यापासून वंचित असतात, गरीब असतात, त्यांना काम करावेच लागते, अन्यथा उपाशी मरण्याचा एकच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहतो. कामगारांची विशाल सेना भांडवली उत्पादन प्रणाली कायम ठेवण्यासाठीची अनिवार्य अट आहे. एखाद्या कामगाराची जागा घेण्यासाठी जोपर्यंत दुसरा कामगार नेहमी हजर असतो तोपर्यंत भांडवलदार वर्ग त्यांच्या वेतनात कपात करीत राहतो. तो त्यांना इतकेच वेतन देतो, जे त्याला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असते. परंतु आपल्या उत्पादनाच्या कार्यामधून कामगार जे मूल्य निर्माण करतो, ते त्याच्या निर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांपेक्षा, म्हणजेच भांडवलदार वेतन देऊन जे खरेदी करतो, त्या श्रमशक्तीच्या मूल्यापेक्षा कितीतरी अधिक असते.

अतिरिक्त मूल्य- भांडवलदार कच्चा माल, कारखान्याची इमारत, यंत्रसामुग्री इत्यादीच्या रूपात जे मूल्य मिळवतो, त्यामुळे नवीन मूल्य निर्माण होत नाही, त्याचे रूपांतर तयार मालात अथवा उत्पाद मूल्यात होत नाही, ते तसेच्या तसे राहते. त्याचे मूल्य स्थिर राहते, म्हणून ते स्थिर भांडवलाच्या रूपात त्याला लावणाऱ्याच्या स्थिर भांडवलाचा एक हिस्सा असते. दुसऱ्या बाजूला ज्या मूल्याचा वापर भांडवलदार वेतन देण्यासाठी करतात, ते वाढत जाते. कामगारांना कामावर ठेवताना जे मूल्य निर्धारित होते, त्याची रक्कम वाढत जाते. ही रक्कम बदलत राहते म्हणूनच तिला परिवर्तनीय भांडवल म्हटले जाते. कामगारांच्या श्रमशक्तीचे मूल्य (वेतन) आणि उत्पादनानंतर बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूचे मूल्य यातील फरकच भांडवलदारासाठी नफ्याचा स्रोत असतो. कामगार उत्पादन करून जे मूल्य निर्माण करतो, ते त्याच्या श्रमशक्तीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, यालाच अतिरिक्त मूल्य असे म्हटले जाते.

अतिरिक्त मूल्याचा दर- जास्तीत जास्त नफा मिळवणे व आपले भांडवल वाढवत नेणे हे भांडवलदाराचे उद्दीष्ट असते आणि ते कधीच पूर्णपणे प्राप्त होत नाही. ते अंतहीन असते. नफा मिळविण्याची त्यांची तृष्णा कधीच समाप्त होत नाही. कामगारांनी निर्माण केलेल्या मूल्यातील आपला हिस्सा वाढवत नेण्यासाठी आणि वेतनाच्या रुपात कामगारांना द्यायचा हिस्सा सतत कमीत कमी करीत नेण्यासाठी ते वाटेल ते करतात, अगदी उचित, अनुचित याची पर्वा न करता. अतिरिक्त मूल्याच्या वेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमाणाला अतिरिक्त मूल्याचा दर म्हटले जाते. भांडवलदार अतिरिक्त मूल्यातील आपल्या हिश्श्याचा दर नेहमी वाढता ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो प्रामुख्याने खालील उपाय करतो-
1.       वेतनात वाढ न करता कामाचे दिवस वाढवणे.
2.       कामाचे दिवस किंवा उत्पादनात कपात न करता कामगारांचे वेतन कमी करणे.
3.       क. कामगारांना त्याच वेतनावर ताशी जास्त काम करण्यासाठी बाध्य करणे. ख. तंत्रज्ञानात व उत्पादन प्रणालीत सुधारणा करून ताशी उत्पादनात वाढ करणे.

वर्ग संघर्ष- भांडवलदार आणि कामगार यांचे हित एकमेकांच्या पूर्णपणे विपरीत किंवा विरोधी असते. कामाच्या दिवसाच्या विभाजनाच्या विषयावर दोघांचा संघर्ष होत राहतो. त्या दोघांची दिशा वेगवेगळी म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध जाणारी असते. भाडवलदारांना वाटते की त्यांचा नफा वाढत रहावा. त्यासाठी ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात, मग तो उचित असो वा अनुचित याच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नसते, त्यांना मतलब असतो फक्त त्यांच्या वाढत जाणाऱ्या नफ्याशी. त्यासाठी ते आपल्या कामगारांच्या फक्त कामगार संघटनेबाबतच्याच नाही तर मानवी अधिकारांचे दमन करायला देखील मागे पुढे पाहत नाही. याउलट कामगारांना असे वाटते की त्यांचे वेतन वाढावे कारण ही त्यांच्या कष्टाची कमाई आहे. त्यांच्या श्रमशक्तीमुळे भांडवलदार अतिरिक्त मूल्याची निर्मिती करतात. पण जेव्हा त्या अतिरिक्त मूल्यामधून कामगारांचा हिस्सा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र भांडवलदार कचरतात. कामगार मागणी करतात की त्यांचे वेतन वाढवले जावे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करावी आणि त्यांच्या कामगार संघटना विषयक व मानवी अधिकारांचे हनन केले जाऊ नये. हीच ती कारणे आहेत, ज्यांच्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये अंतर्विरोधाची परिस्थिती तयार होते आणि हाच अंतर्विरोध पुढे जाऊन वर्ग संघर्षाचे रूप धारण करतो.

कामगार चळवळीचे कार्य- आपल्या रोजच्या मागण्या व समस्यांवर लढा करत असतानाच कामगार संघटनांनी  कामगारांची शोषण आणि अन्यायावर आधारित व्यवस्थेच्या बाबतीमधील समजदारी वाढवणे देखील खूप आवश्यक आहे. उत्पादन व्यवस्थेतील कामगारांची महत्वाची व मूलभूत भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे. निसर्गात मिळणाऱ्या कच्च्या मालाला वापरण्या योग्य बनवणे व त्यातून मानवजातीच्या गरजा भागवणे यासाठी कामगारांची श्रमशक्ती अनिवार्य आहे. वस्तू व सेवांचे उत्पादन हे सर्वस्वी कामगारांच्या श्रमशक्तीवर अवलंबून आहे. केवळ भांडवलदारांनी गुंतवलेले स्थिर भांडवल यांचे उत्पादन करू शकत नाही आणि म्हणूनच कामगारांना त्यांच्या शक्तीची, फक्त उत्पादनातीलच नाही तर वर्ग संघर्षातील त्यांच्या महत्वाच्या भूमिकेची ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी भांडवली उत्पादन प्रक्रिया नीट समजून घेतली पाहिजे.
ह्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेचा पाया आहे उत्पादन व्यवस्था आणि त्या उत्पादन व्यवस्थेतील उत्पादन संबंध, वर्गीय अंतर्विरोध, वर्ग संघर्ष. आजपर्यंतचा इतिहास आहे की उत्पादक शक्तींमधील संघर्षामुळे व त्यातील संतुलन बदलल्यामुळे उत्पादन व्यवस्था बदलली आणि त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था. आजच्या भांडवली व्यवस्थेतील प्रमुख उत्पादक शक्ती आहे कामगार वर्ग, हे आपण वर पाहिले आहे आणि म्हणूनच ही शोषणावर आधारित व्यवस्था बदलण्याची शक्ती देखील ह्याच वर्गाकडे आहे. ह्या परिवर्तनाची प्रक्रिया देखील कामगारांनी समजून घेतली पाहिजे.

भांडवली उत्पादन- सामाजिक उत्पादन- आधीच्या उत्पादन व्यवस्थांपेक्षा वेगळे असे वैशिष्ठ्य आहे, भांडवली उत्पादनाचे सामाजिक स्वरूप. मानवजातीच्या गरजा भागवणाऱ्या आणि त्याचे जीवन समृद्ध करणाऱ्या वस्तू व सेवांचे भांडवलशाहीतील उत्पादन सामाजिक पातळीवर होत असते. अनेक कामगार एकत्र येऊन वापरण्या योग्य वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. परंतु त्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या अतिरिक्त मूल्याचा कब्जा मात्र भांडवलदार उत्पादनाच्या साधनांच्या खाजगी मालकीच्या जोरावर, वैयक्तिक पातळीवर स्वत:कडे घेतात. यातूनच निर्माण होते विषमता. विषमता ही भांडवलदारी उत्पादन व्यवस्थेतील अंगभूत शोषणामधूनच निर्माण होते. आणि भांडवलदारी व्यवस्था नष्ट केल्याशिवाय शोषण आणि विषमता नष्ट होऊ शकणार नाही.

आदिम संचय- भांडवल निर्मितीची सुरवात- निसर्ग, कृषी आणि कारागिरांच्या घरेलू उत्पादनाच्या लुटीमधून सुरवातीचे म्हणजेच आदिम भांडवल निर्माण झाले. ते इमारत, यंत्र सामुग्री आणि कच्चा माल यात छोट्या प्रमाणात गुंतवून कामगारांची श्रमशक्ती कामाला लावून, सामाजिक उत्पादनामधून कामगारांनी निर्माण केलेले अतिरिक्त मूल्य, उत्पादनाच्या साधनांच्या खाजगी मालकीच्या जोरावर स्वत:च्या ताब्यात घेऊन भांडवलदार वर्ग आपले भांडवल वाढवत नेतो. अशा रितीनेच भांडवली व्यवस्थेची सुरवात झाली. सुरवातीला शेतकऱ्यांच्या, कारागिरांच्या लुटीमधून सावकारांनी, व्यापाऱ्यांनी भांडवलाचा संचय केला आणि त्यानंतर भांडवली उत्पादनात अंगभूत असलेल्या कामगारांच्या शोषणामधून भांडवलशाहीचा पुढचा विकास झाला.

सुरवातीला स्पर्धा- नंतर केंद्रीकरण- भांडवलदारी व्यवस्थेच्या सुरवातीला भांडवलदारांमध्ये मुक्त स्पर्धा होती पण नंतर कच्चा माल आणि बाजाराच्या कमतरतेमुळे हळू हळू या स्पर्धेने जीवघेणे स्वरूप धारण केले व परिणामी भांडवलाचे केंद्रीकरण होऊ लागले. मुक्त स्पर्धेची जागा मक्तेदारी भांडवलशाहीने घेतली. या प्रक्रियेतून प्रचंड मोठ्या कंपन्या निर्माण झाल्या. त्यांना कच्चा माल व बाजाराची कमतरता जाणवू लागली आणि त्यांनी ह्या दोघांच्या शोधात आपल्या देशाच्या सीमा ओलांडल्या.

वसाहतवाद व साम्राज्यवाद- भांडवलाचे एक वैशिष्ठ्य आहे. ते विस्तार केल्याशिवाय व स्वत:च्या नफ्यात जास्तीत जास्त वाढ केल्याशिवाय जगू शकत नाही. सुरवातीच्या काळात भांडवलशाहीने कामगारांचे प्रचंड शोषण करून स्वत:चा विकास करून घेतला. त्या विकासात सर्वात मोठा अडसर होता, तो म्हणजे कच्च्या मालाची व बाजाराची कमतरता. ह्या दोन्ही गोष्टींच्या शोधात युरोपातील देशांनी संपूर्ण जग पालथे घातले. यातूनच अमेरिकेचा शोध, आफ्रिका, आशिया खंडातील देशामध्ये वसाहतींचा विस्तार ह्या सर्व घडामोडी घडल्या. कच्चा माल, बाजाराबरोबरच स्वस्त मजूर मिळवण्यासाठी देखील जगभरात विस्तार केला गेला. या देशांचे शोषण करणे सुकर होण्यासाठी त्यांना गुलाम करण्यात आले आणि भांडवली देशांचे रुपांतर साम्राज्यशहांमध्ये आणि तिसऱ्या जगातील देशांचे रुपांतर वसाहतींमध्ये झाले. या सर्व वसाहतींचे प्रचंड साम्राज्यवादी शोषण करून भांडवलशाहीचा विकास झाला. अमेरिकेचा इतिहास तर अमानवी आणि रक्तरंजित कत्तलींनी भरलेला आहे. स्थानिक रहिवाश्यांच्या कत्तली, तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर कब्जा आणि अमानुष पद्धतीने गुलाम करून जबरदस्तीने आणलेल्या आफ्रिकेतील रहिवाश्यांचे ओरबाडून घेतलेले श्रम यामुळे अमेरिकेचे रुपांतर एका विकसित भांडवलशाही देशात झाले. ह्या भांडवलशाही व्यवस्थेच्या विकासाबरोबरच युरोप, अमेरिकेत अजून एका शक्तीचा उदय झाला. ती शक्ती म्हणजेच कामगार वर्ग.

कामगार वर्गाचा उदय- भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेने जन्म दिलेली परंतु भांडवलशाही शोषणामुळे पिचलेली आणि भांडवलशाहीचा अंत होण्यामुळेच जिची शोषणापासून मुक्तता होऊ शकते अशी शक्ती म्हणजे कामगार वर्ग. ज्याच्या श्रमामुळे भांडवलशाहीचा विकास होतो, तंत्रज्ञानात क्रांती होऊन उत्पादन प्रक्रियेचा विकास होतो पण ज्याच्या शोषणाशिवाय भांडवलशाही जिवंत राहू शकत नाही अशी ही शक्ती. ह्या शक्तीचा याच काळात उदय झाला आणि तिने लवकरच आपल्या शोषणाविरुद्ध लढा द्यायला सुरवात केली. भांडवलाचे स्वरूप जागतिक असल्यामुळे कामगार वर्गाच्या लढ्याचे स्वरूप देखील जागतिक असणे अनिवार्य आहे. १५० वर्षांपूर्वी कार्ल मार्क्सने भांडवलशाहीच्या गर्भातून जन्म घेणारा हा वर्गच भांडवलशाहीचा कर्दनकाळ ठरणार आहे हे ओळखले होते.  भांडवलशाहीला सातत्याने आर्थिक संकटाच्या खाईत लोटले जाईल आणि कामगार वर्गच त्यातून मार्ग काढेल आणि त्या संकटाशी झुंज देऊन स्वत: बरोबरच संपूर्ण समाजाची मुक्ती देखील हाच वर्ग करेल असे शास्त्रीय विश्लेषण त्याने केले.

भांडवलशाहीतील अंगभूत आर्थिक संकट- श्रमशक्तीचे शोषण केल्याशिवाय जशी भांडवलशाही वाढू शकत नाही तसेच भांडवलशाहीचे अजून एक वैशिषठ्य म्हणजे ती समाजाच्या सर्वच घटकांची लूट करते. राज्यव्यवस्था ताब्यात ठेऊन तिच्या मदतीने कच्चा माल पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची बाजारपेठेत प्रचंड लूट करते. खाणी, जंगल, जमीन आणि पाणी ह्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी स्थानिक आदिवासी, आदिम जमाती यांची निर्मम लूट आणि विस्थापन करते. वेतनाचा स्तर खाली ठेवण्यासाठी बेरोजगारी, अर्ध बेरोजगारी निर्माण करणारी आर्थिक धोरणे आखते. चंगळवाद, मानवी मूल्यांचा ऱ्हास व स्त्रियांसहित सर्व घटकांचे वस्तूकरण करणाऱ्या भणंग संस्कृतीला जन्म देते. ह्या सर्व परिस्थितीमधून एका बाजूला बाजारीकरण वाढते तर दुसऱ्या बाजूला शोषणाचा स्तर वाढल्यामुळे कामगारांची, आणि एकूणच सर्व जनतेची क्रयशक्ती कमालीची घटत जाते. भांडवली उत्पादन प्रणालीमधून उत्पादन प्रचंड वाढते, बाजारात वस्तूंचा भडीमार होतो पण त्या वस्तू खरेदी करण्याची लोकांची शक्ती कमी होत जाऊन शेवटी अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले जाते. अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर जोडली गेल्यामुळे हे संकट हळू हळू सर्व जगाला व्यापते. आज युरोप, अमेरिका, आशियातील अनेक देशांना २००८ मध्ये सुरु झालेल्या मंदीने अजूनही जखडूनच ठेवले आहे. ह्या मंदीचा कामगारांच्या जीवनमानावर भयंकर परिणाम झाला. लोकांच्या २०११च्या वास्तविक वेतनाचा स्तर १९६८ च्या स्तराच्याही खाली गेला होता.   

वित्तीय भांडवलाचा विकास आणि जागतिकीकरण- संजामी व्यवस्थेत आणि भांडवलशाहीच्या अगदी सुरवातीच्या काळात उद्योग उभे करू इच्छिणाऱ्या पण त्यासाठी स्वत:कडे पुरेसे भांडवल नसलेल्या उद्योजकांना खजगी सावकार व्याजावर भांडवल पुरवत असत. भांडवलशाहीचा विकास झाल्यावर अशा सावकारांनी एकत्र येऊन पेढ्या व खाजगी बँकांची स्थापना केली व प्रत्यक्ष उत्पादनाक भांडवलापेक्षा स्वतंत्र अशा वित्त भांडवलाने जन्म घेतला. भांडवलदारी व्यवस्थेच्या जागतिकीकरणाची फार मोठी प्रेरक शक्ती म्हणजे हे वित्त भांडवल. भांडवलाच्या आवक, जावकावरची सर्व बंधने काढून टाकून त्याला मुक्त करणे व जिथे जास्त नफा मिळेल तिथे गुंतवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे हेच जागतिकीकरणाचे खरे उद्दीष्ट होते. भांडवल आणि वस्तूंच्या बाजाराला पूर्ण मुक्त करून जग म्हणजे जणू काही एक गाव असल्याचा भ्रम निर्माण करणे हे प्रत्यक्षात मात्र ह्या बाजाराच्या किल्ल्यांवर मात्र साम्राज्यवादी, बहुराष्ट्रीय भांडवलदारांचा एकाधिकार निर्माण करणे हेच त्यांचे खरे उद्दीष्ट आहे. उत्पादन प्रक्रिये व्यतिरिक्त नफा कमवण्याचा एक मार्ग जागतिकीकरणानंतर भांडवलाच्या पूर्ण प्रवाहीपणामधून आणि त्याच्या मुक्त वावरामधून तयार झालेला आहे. तो म्हणजे सट्टा बाजार आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजार. ह्या प्रक्रियेत नफा कमविण्यासाठी उत्पादनात भांडवल गुंतवण्याचे कोणतेही बंधन तर नाहीच उलट ते भांडवल अल्प कालावधीसाठी शेअर बाजारात गुंतवून त्याच्या प्रवाहीपणाचा फायदा घेऊन ते कधीही काढून घेऊन दुसरीकडे गुंतवता येते. ह्या प्रक्रियेत वित्त भांडवल, उत्पादक भांडवलाच्या वरचढ होते. त्यातून कोणतीही लांब पल्ल्याची गुंतवणूक होत नाही, रोजगारात वाढ होत नाही आणि एक प्रकारची अस्थिरता निर्माण होते. शिवाय अशा मार्गाने काळा पैसा गुंतवून पांढरा करण्याचा, कर बुडवेगिरी करण्याचा मार्ग देखील सहज चोखाळता येतो. 
        
संकटातून बाहेर पडण्याचा भांडवली मार्ग- आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा भांडवली मार्ग हा कामगारांवर आणि जनतेवर त्या संकटाचे सर्व ओझे लादून जनतेचे जगणे कठीण करण्याच्या वाटेने जातो. उत्पादनात कपात करून बेरोजगारीत वाढ करणे, कामगारांच्या अधिकारांचे रक्षण करणाऱ्या कामगार कायद्यांच्या संरक्षणावर गदा आणून त्यांची कामाची सुरक्षा काढून घेणे, कायम कामाऐवजी कंत्राटीकरण, रोजंदारीकरण करून कामगारांच्या वास्तविक वेतनात आणि अन्य लाभांमध्ये कपात करणे, जनतेच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या तरतुदींमध्ये कपात करून जनतेला जो काही थोडाफार दिलासा मिळतो त्यातही पाचर ठोकणे अशी सर्व कामगार विरोधी, जनविरोधी पावले उचलून भांडवलदार वर्ग त्या संकटातून बाहेर पडायला बघतो पण प्रत्यक्षात अर्थव्यवस्था मात्र त्या संकटातून बाहेर न पडता अजूनच जास्त रुतत जाते. म्हणूनच संकटातून बाहेर पडण्याचा भांडवली मार्ग कधीच यशस्वी होत नाही. 

संकटातून बाहेर पडण्याचा समाजवादी मार्ग- हा मार्ग कार्ल मार्क्सने आपल्या सिद्धांतामधून आणि १९१७च्या रशियन ऑक्टोबर समाजवादी क्रांतीने प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिला आहे. भांडवलदार वर्गाचा पराजय, भांडवलशाही राज्याचा पराजय हाच तो खरा मार्ग. खऱ्या अर्थाने वर्गीय दृष्टीकोणातून शिक्षित कामगार वर्ग, भांडवली उत्पादन प्रक्रियेला नीट समजून घेऊन शोषण समाप्त करण्यासाठी वर्ग संघर्ष तीव्र करून परिवर्तन आणू शकतो. भांडवली संकटाला त्याच व्यवस्थेच्या विरोधात वापरून कामगार वर्ग हा मार्ग काढतो. जगात पसरणारा फॅसिझम, विश्व युद्धानंतर आलेली मंदी यामधून रशियन कामगार वर्गाने समाजवादी क्रांतीचा मार्ग दाखवला. केन्स सारख्या काही अर्थतज्ञांनी राज्याचा बाजारात हस्तक्षेप, सार्वजनिक खर्चात वाढ असेही काही उपाय सुचवले परंतु भांडवलशाही त्यातून पूर्ण सावरत नाही तर वारंवार तेजी, मंदीच्या चक्राकार संकटातून जाते कारण भांडवलशाही व्यवस्थेतील सामाजिक उत्पादन आणि वैयक्तिक नफा या मूलभूत अंतर्विरोधामध्ये त्यातून कोणताच बदल होत नाही. उत्पादनाच्या साधनांवरील आपल्या खाजगी मालकीच्या जोरावर जास्तीत जास्त नफा आपल्याकडे वळवण्याची भांडवली व्यवस्था तशीच राहते. विज्ञान, तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व समाजाच्या भल्यासाठी न करता त्याचा वापर फक्त नफा वाढवून घेण्यासाठी करण्याची वृत्ती तशीच राहते. आणि शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे कामगार वर्गाचे शोषण आणि जनतेची लूट करणारी अन्याय्य, दमनकारी व्यवस्था तशीच राहते. म्हणूनच कामगार वर्गाच्याच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मुक्तीचा एकच मार्ग म्हणजे शोषण, अन्याय, लूट, दमन यावर आधारित भांडवलशाही अर्थव्यवस्था व त्याची सामाजिक, राजकीय व्यवस्था नष्ट करून समतामूलक, शोषणविरहित समाजवादी व्यवस्था निर्माण करणे. आणि हा मार्ग केवळ आणि केवळ कामगार वर्गच सातत्याने तीव्र होत जाणाऱ्या वर्गसंघर्षाच्या माध्यमातून अंतिमत: समाजवादी क्रांती करूनच प्रत्यक्षात आक्रमू शकतो व फक्त कामगार वर्गालाच नाही तर समस्त मानवजातीला शोषण, अन्याय व विषमतेपासून मुक्ती मिळवून देऊ शकतो. अशा समाजवादी क्रांतीसाठी कामगार वर्गाला तयार करणे, कामगारांना त्यांच्या कामावरच्या रोजच्या प्रश्नांवर संघटित करत असतानाच त्यांची भांडवलशाही व्यवस्थेबाबतची वर्गीय चेतना उंचावणे आणि भांडवलशाहीला समाजवादच हा एकमेव पर्याय आहे व त्यासाठी वर्गसंघर्षाद्वारे ही शोषणावर आधारित राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था नष्ट करणे हे एक वर्ग म्हणून त्यांचे कार्य आहे ही क्रांतिकारी चेतना त्यांच्यामध्ये निर्माण करणे हे सिटू सारख्या क्रांतिकारी कामगार संघटनेचे काम आहे.